विज्ञान व तंत्रज्ञान विकास
अर्थव्यवस्थेच्या विकासाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाशी जवळून संबंध असल्याने 'विज्ञान-तंत्रज्ञान' हा घटक अर्थशास्त्राशी संबंधित एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या पेपर ४
मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
या घटकाची तयारी कशी करावी, याविषयी..
अर्थव्यवस्थेचा
विकास हा बव्हंशी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून असतो. उमेदवारांनी पूर्व
परीक्षेसाठी 'सामान्य
विज्ञान' समजून घ्यायला हवे. मुख्य
परीक्षेसाठी सामान्य विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजेच तंत्रज्ञान हे वेगवेगळ्या 'आíथक' बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे.
मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर लक्षात येते की, तंत्रज्ञान व त्याचा मानवी कल्याणासाठी
उपयोग या अनुषंगाने सर्व घटक अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. या
घटकाचा पद्धतशीर अभ्यास कशा प्रकारे करायचा ते पाहू या.
ऊर्जा
या घटकातील ऊर्जा साधने व त्यांचे प्रकार, स्वरूप, ऊर्जा निर्मिती या घटकांमधील वैज्ञानिक संकल्पना व्यवस्थित समजावून घेणे आवश्यक आहे. ऊर्जा निर्मितीमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या साधनांमागची तत्त्वे, प्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती करून घ्यायला हवी. ऊर्जेची गरज, वेगवेगळ्या क्षेत्रांतील वापर, मागणी, ऊर्जा निर्मिती, पुरवठा इत्यादी आकडेवारी (टक्केवारी) देशस्तरीय व राज्यस्तरीय आíथक पाहणी अहवालातून अभ्यासायला हवी. याबाबतच्या देशस्तरीय आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचे असलेले स्थान माहीत असणे आवश्यक आहे. ऊर्जा निर्मिती, मागणी, वापर व पुरवठा इत्यादींबाबत महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत असलेला क्रमांक माहीत करून घ्यावा. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे प्रकार व त्यांचा ऊर्जा निर्मितीमधील वाटा समजून घ्यायला हवा. ऊर्जा निर्मितीसाठीच्या विविध योजनांचा अभ्यास तक्तयामध्ये करता येईल. वेगवेगळ्या योजनांबाबत त्यांची उद्दिष्टे, त्यासाठी विहित कार्यपद्धती, खर्चाचे वितरण, अंमलबजावणी यंत्रणा, यशापयश अशा मुद्दय़ांवर आधारित तक्ता तयार करून अभ्यास करावा. याबाबत संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती, राजकीय पलू इत्यादींचा आढावा घेणे आवश्यक आहे. भारत व महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवाल व इंडिया ईयर बुक या स्रोतांमधून आपली माहिती अद्ययावत करायला हवी.
या घटकातील ऊर्जा साधने व त्यांचे प्रकार, स्वरूप, ऊर्जा निर्मिती या घटकांमधील वैज्ञानिक संकल्पना व्यवस्थित समजावून घेणे आवश्यक आहे. ऊर्जा निर्मितीमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या साधनांमागची तत्त्वे, प्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती करून घ्यायला हवी. ऊर्जेची गरज, वेगवेगळ्या क्षेत्रांतील वापर, मागणी, ऊर्जा निर्मिती, पुरवठा इत्यादी आकडेवारी (टक्केवारी) देशस्तरीय व राज्यस्तरीय आíथक पाहणी अहवालातून अभ्यासायला हवी. याबाबतच्या देशस्तरीय आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचे असलेले स्थान माहीत असणे आवश्यक आहे. ऊर्जा निर्मिती, मागणी, वापर व पुरवठा इत्यादींबाबत महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत असलेला क्रमांक माहीत करून घ्यावा. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे प्रकार व त्यांचा ऊर्जा निर्मितीमधील वाटा समजून घ्यायला हवा. ऊर्जा निर्मितीसाठीच्या विविध योजनांचा अभ्यास तक्तयामध्ये करता येईल. वेगवेगळ्या योजनांबाबत त्यांची उद्दिष्टे, त्यासाठी विहित कार्यपद्धती, खर्चाचे वितरण, अंमलबजावणी यंत्रणा, यशापयश अशा मुद्दय़ांवर आधारित तक्ता तयार करून अभ्यास करावा. याबाबत संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती, राजकीय पलू इत्यादींचा आढावा घेणे आवश्यक आहे. भारत व महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवाल व इंडिया ईयर बुक या स्रोतांमधून आपली माहिती अद्ययावत करायला हवी.
संगणक
व माहिती तंत्रज्ञान
संगणक कार्यपद्धती, नेटवìकग, वेब तंत्रज्ञान या बाबींचा अभ्यास मूलभूत आणि उपयोजित संकल्पनांच्या आधारे करायला हवा. सायबर कायद्याचा अभ्यास पेपर- २ मधील विधी घटकामध्ये पूर्ण होईल. माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे आíथक महत्त्व वेगवेगळ्या पलूंच्या आधारे अभ्यासायला हवे. रोजगार निर्मिती, आयात-निर्यात, परकीय गुंतवणूक व ॅऊढ मधील या उद्योगाचा वाटा नेमका किती आहे हे आíथक पाहणी अहवालातून अभ्यासायला हवे. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील समस्यांचे स्वरूप, कारणे, उपाय या बाबींचा अभ्यास इंडिया ईयर बुक व दैनंदिन घडामोडी यांद्वारे करावा. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासंबंधित शासकीय धोरणे व विविध शासकीय उपक्रमांचा अभ्यास हा त्यांचे उद्दिष्ट, स्वरूप, अंमलबजावणी, खर्चाची विभागणी इत्यादी मुद्दय़ांच्या अनुषंगाने
करायला हवा.
संगणक कार्यपद्धती, नेटवìकग, वेब तंत्रज्ञान या बाबींचा अभ्यास मूलभूत आणि उपयोजित संकल्पनांच्या आधारे करायला हवा. सायबर कायद्याचा अभ्यास पेपर- २ मधील विधी घटकामध्ये पूर्ण होईल. माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे आíथक महत्त्व वेगवेगळ्या पलूंच्या आधारे अभ्यासायला हवे. रोजगार निर्मिती, आयात-निर्यात, परकीय गुंतवणूक व ॅऊढ मधील या उद्योगाचा वाटा नेमका किती आहे हे आíथक पाहणी अहवालातून अभ्यासायला हवे. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील समस्यांचे स्वरूप, कारणे, उपाय या बाबींचा अभ्यास इंडिया ईयर बुक व दैनंदिन घडामोडी यांद्वारे करावा. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासंबंधित शासकीय धोरणे व विविध शासकीय उपक्रमांचा अभ्यास हा त्यांचे उद्दिष्ट, स्वरूप, अंमलबजावणी, खर्चाची विभागणी इत्यादी मुद्दय़ांच्या अनुषंगाने
करायला हवा.
अवकाश
तंत्रज्ञान
या घटकाचे कालानुक्रमांवर आधारित तक्ते अनेक संदर्भ साहित्यात सापडतात. या तक्त्यामध्ये उपक्रमाची ठळक वैशिष्टय़े, उपयोजन व आनुषंगिक माहिती हे तीन मुद्दे समाविष्ट केल्यास विविध कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने, क्षेपणास्त्रे व विविध अवकाश प्रकल्प याविषयी अभ्यास होऊ शकेल. यातून या तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला हे तुलनात्मकदृष्टय़ा अभ्यासता येईल. कृत्रिम उपग्रह, क्षेपणास्त्र, सुदूर संवेदन व जीआयएस या तंत्रज्ञानामागची वैज्ञानिक तत्त्वे, त्यांची कार्यपद्धती व उपयोग या बाबी विज्ञानविषयक संदर्भ साहित्याद्वारे अभ्यासायला हव्यात. सुदूर संवेदनासाठी भूगोलविषयक पुस्तक उपयुक्त ठरते. मात्र, इंटरनेटच्या माध्यमातून माहिती जमवणे, नव्या संकल्पना समजून घेणेही
आवश्यक आहे.
या घटकाचे कालानुक्रमांवर आधारित तक्ते अनेक संदर्भ साहित्यात सापडतात. या तक्त्यामध्ये उपक्रमाची ठळक वैशिष्टय़े, उपयोजन व आनुषंगिक माहिती हे तीन मुद्दे समाविष्ट केल्यास विविध कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने, क्षेपणास्त्रे व विविध अवकाश प्रकल्प याविषयी अभ्यास होऊ शकेल. यातून या तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला हे तुलनात्मकदृष्टय़ा अभ्यासता येईल. कृत्रिम उपग्रह, क्षेपणास्त्र, सुदूर संवेदन व जीआयएस या तंत्रज्ञानामागची वैज्ञानिक तत्त्वे, त्यांची कार्यपद्धती व उपयोग या बाबी विज्ञानविषयक संदर्भ साहित्याद्वारे अभ्यासायला हव्यात. सुदूर संवेदनासाठी भूगोलविषयक पुस्तक उपयुक्त ठरते. मात्र, इंटरनेटच्या माध्यमातून माहिती जमवणे, नव्या संकल्पना समजून घेणेही
आवश्यक आहे.
जैव
तंत्रज्ञान, आण्विक
धोरण व आपत्ती व्यवस्थापन
या तिन्ही घटकांचे अभ्यासक्रमात सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात नमूद केलेल्या प्रत्येक मुद्दय़ाच्या अनुषंगाने अभ्यास करणे आवश्यक आहे. हे मुद्दे या प्रत्येक घटकाचे विविध पलू आहेत आणि त्यांचा अभ्यास म्हणजेच त्या त्या घटकाचा तार्किक व संकल्पनात्मक अभ्यास आहे. या तिन्ही घटकांबाबत 'चालू घडामोडी' हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी इंडिया ईयर बुक व आíथक पाहणी अहवाल इत्यादींमधील संबंधित प्रकरणे बारकाईने अभ्यासावी लागतील.
'भारताचे आण्विक धोरण' असा घटक असला तरी आण्विक तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. 'आपत्ती' या फक्त अभ्यासक्रमात नमूद केलेल्या संकटांपुरत्याच मर्यादित नाहीत. याबाबत उमेदवार 'चालू घडामोडीं'बाबत जागरूक असणे अपेक्षित आहे.
या घटकासाठी पक्का संकल्पनात्मक अभ्यास आणि त्यावर आधारित उपयोजित मुद्दय़ांचा अभ्यास असे दुहेरी अभ्यासतंत्र आवश्यक आहे. संकल्पनात्मक अभ्यासासाठी मूलभूत विज्ञानाची पुस्तके व उपयोजित मुद्दय़ांसाठी 'इंडिया ईयर बुक'चा उपयोग केल्यास अभ्यास योग्य पद्धतीने होईल. संदर्भ साहित्यामध्ये 'योजना' व 'सायन्स रिपोर्टर' यांचा समावेश केल्यास या अभ्यासाला पुरेशी खोली प्राप्त होईल.
या तिन्ही घटकांचे अभ्यासक्रमात सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात नमूद केलेल्या प्रत्येक मुद्दय़ाच्या अनुषंगाने अभ्यास करणे आवश्यक आहे. हे मुद्दे या प्रत्येक घटकाचे विविध पलू आहेत आणि त्यांचा अभ्यास म्हणजेच त्या त्या घटकाचा तार्किक व संकल्पनात्मक अभ्यास आहे. या तिन्ही घटकांबाबत 'चालू घडामोडी' हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी इंडिया ईयर बुक व आíथक पाहणी अहवाल इत्यादींमधील संबंधित प्रकरणे बारकाईने अभ्यासावी लागतील.
'भारताचे आण्विक धोरण' असा घटक असला तरी आण्विक तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. 'आपत्ती' या फक्त अभ्यासक्रमात नमूद केलेल्या संकटांपुरत्याच मर्यादित नाहीत. याबाबत उमेदवार 'चालू घडामोडीं'बाबत जागरूक असणे अपेक्षित आहे.
या घटकासाठी पक्का संकल्पनात्मक अभ्यास आणि त्यावर आधारित उपयोजित मुद्दय़ांचा अभ्यास असे दुहेरी अभ्यासतंत्र आवश्यक आहे. संकल्पनात्मक अभ्यासासाठी मूलभूत विज्ञानाची पुस्तके व उपयोजित मुद्दय़ांसाठी 'इंडिया ईयर बुक'चा उपयोग केल्यास अभ्यास योग्य पद्धतीने होईल. संदर्भ साहित्यामध्ये 'योजना' व 'सायन्स रिपोर्टर' यांचा समावेश केल्यास या अभ्यासाला पुरेशी खोली प्राप्त होईल.
भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विकास
भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विकास
विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास करणे व विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातून राष्ट्रीय विकास साधने भूमिकेतून भारताने पहिले वैज्ञानिक धोरण जाहिर केले. – ४ मार्च १९५८ (पं. नेहरू)
राष्ट्राच्या प्रगतीतील तंत्रज्ञानाचे महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने तंत्रज्ञानाविषक निवेदन (Technology Policy Statement) जाहिर केले-१९८३
विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रासाठी पंचवार्षिक योजनांतून दरवर्षी आर्थिक तरतूद करण्यात येते.
विज्ञान व तंत्रज्ञान नियोजनाचे तीन विभाग ( डी. एस. टी. स्थापना, मे १९७१ )
१) विज्ञान आणि तंत्रज्ञान, औद्यागीक संशोधन, सागरी विकास , अवकाश संशोधन, अणुऊर्जा
२) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), भारतीय कृषी संशोधन परिषद ( ICAR), दळणवळण विभाग, इलेक्ट्रॉनिक्स विभाग, अपारंपारिक ऊर्जा विभाग, जलसिंचन विभाग, उद्योग विभाग इ. ३० विभाग
३) राज्ये व संघराज्य प्रदेशांसाठी शास्त्र व तंत्रज्ञानाचा स्वतंत्र विभाग
केंद्रशासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञानविषयक संशोधन संस्था -
१. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद ( CSIR ) १९४२
२. भारतीय कृषी संशोधन परिषद ( ICAR )
३. भारतीय वैद्यकीय परिषद – ICMR
४. इलेक्ट्रॉनिक्स विभाग -DOE
५. संरक्षण व विकास संघटना – PRDO
६. पर्यावरण विभाग – DOEN
७. अणुऊर्जा विभाग – DAE
८. अवकाश विभाग – DOS
९. सागरी विकास विभाग-DOD
विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय –
१. विज्ञान तंत्रज्ञान
२. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन
३. विक तंत्रज्ञान
ह्याच प्रकारे केंद्र सरकारच्या व अन्य मंत्रालयाच्या संशोधन संस्था, सार्वजनिक उद्योगांची संशोधन व विकास कामांसाठी स्थापन केलेल्या संस्था, राज्य सरकारांनी शासकीय स्तरावर स्थापन केलेल्या संस्था त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठे व त्या अंतर्गत कार्य करणा-या संशोधन संस्था. देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार करता शिक्षण, संशोधन व विकास यातील कार्य करणा-या संस्थांची संख्या जवळपास तीन हजारापर्यंत आहे.
महाराष्ट्र राज्यात २००५ मध्ये डॉ. वसंत गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी विज्ञान, तंत्रज्ञान आयोगाची स्थापना करण्यात आली.
१८ स्वायत्त वैज्ञानिक संस्था
१. बोस इन्स्टिट्युटः कोलकाता
२. आगरकर रिसर्च इन्स्टिट्युटःपुणे
३. श्री चित्रा तिरूनाल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नोलॉजीः तिरूअनंतपूरम (केरळ)
४. इंडियन असोसिएशन फॉर दि. कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेसः कोलकाता
५. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ऍस्ट्राफिजिक्सःबंगळूर
६. इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ ट्रापिकल मटेरिलॉजीः पुणे
७. जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्चः बंगळूर
८. रामन रिसर्च सेंटरः बंगळूर
९. बिरबल सहानी इन्स्टिट्युट ऑफ पॅलिओ बॉटनीः लखनौ
१०. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ जिओमॅग्नेटिझमः मुंबई
११. वाडिया इन्स्टिट्युट ऑफ हिमालयीन जिऑलॉजीः डेहराडून
१२. इंटरनॅशनल ऍडव्हान्स सेंटर फॉर पॉवडर मेटॉलॉजी ऍन्ड न्यु मटेरिअल्सः हैद्राबाद
१३. एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेसः कोलकाता
१४. टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फॉर कास्टींग ऍण्ड असेसमेंट कौन्सिल – नवी दिल्ली.
१५. विज्ञान प्रसार संस्था- नवी दिल्ली
१६. राष्ट्रीय परिक्षण आणि अंशाकन बोर्ड – नवी दिल्ली.
१७. द्रव क्रिस्टल शोध केंद्र- बंगलोर.
१८. आर्यभट्ट संशोधन वेधशाळा – नैनिताल.
देशात विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्थापना – १९७१.
कार्य – विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील बाबींचा विकास करणे. धोरणात्मक निवेदने प्रसारण करणे, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांना आवश्यक ते तंत्रज्ञान पुरविणे, वैज्ञानिक संशोधन संस्थांना अनुदान देणे. इ.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाची (NSTEDB) ची स्थापना – जाने. १०८२
ग्रामिण जनतेमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या विषयी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय जन विज्ञान जथ्थाचे आयोजन केले होते. – १९९२
द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेस,- बंगलोर (१९०१)
इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशन - (ICSA) – (१९१४) कोलकाता
दि जिऑजिकल सर्व्हे ऑफ इंडिया – (१८५१) डेहरादून
भारतीय हवामान खाते – १८७५ , कार्यालय – दिल्ली, कुलाबा, मद्रास, कलकत्ता, नागपूर, रांची, तिरूचिरापल्ली.
भारतीय सर्वेक्षण संस्था, डेहराडून या संस्थेचे ब्रिद वाक्य – आ सेतु हिमाचल
भारतीय सर्वेक्षण विभागाने UNO च्या NDP चे सहाय्य घेऊन सर्वेक्षण आणि मानचित्र निर्मिती याचे प्रशिक्षण देणारे आशियातील पहिले केंद्र व संशोधन विभाग सुरू केला – (१९७०) हैद्राबाद
मानचित्र मुद्रण कार्य – कोलकाता, हैद्राबाद, डेहराडून
भारतीय विज्ञान अकॅडमी – बंगलोर
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी – दिल्ली
राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी – अलाहाबाद
थेट पंतप्रधानांची जबाबदारी असणारी मंत्रालये – अणुऊर्जा, सागर विकास, विज्ञान व तंत्रज्ञान
बोर्ड ऑफ हाईट मॅथमेटिक्स – मुंबई
भारतीय वन सर्व्हेक्षण – डेहराडून, प्रादेशिक कार्यालय – नागपूर, कोलकाता, बंगळूर, सिमला
भारतीय राष्ट्रीय इंजिनिअरिंग अकॅडमी – दिल्ली
राष्ट्रीय विज्ञान दिन – २८ फेब्रुअवारी
इन्स्टिट्युट ऑफ नॅनो सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजीची स्थापना केली जाणार आहे. – मोहाली
वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद ( सीएमआयाआर) – ही देशातील सर्वोच्च सर्वोत्तम व विकास संस्था आहे. हिच्या अंतर्गत ३८ प्रयोगशाळा व ३९ क्षेत्रीय केंद्र आहे. याचा उद्देश विज्ञान व तंत्रज्ञान यात उच्च यश प्राप्त करून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धाक्षम बनविणे हे आहे.
कलिंगा पारितोषिक – विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांना युनेस्कोतर्फे हा पुरस्कार दिला जातो.
भारतातील अणुऊर्जा संशोधन
भारतीय अणुशक्तीचे जनक – डॉ. होमी भाभा.
टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई (१९४५)
अणु शक्ती किंवा अणु ऊर्जा आयोगाची स्थापना ऑगस्ट १९४८, डॉ. होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. उद्देश- शांततेच्या कार्यासाठी अणु ऊर्जेचा भारतात वापर करणे.
अणु ऊर्जा या स्वतंत्र खात्याची स्थापना – १९५४
तुर्भे (ट्रॉम्बे) येथे अणुसंशोधन केंद्रकाची स्थापना – १९५७
त्याचेच नामकरण- भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर (BARC)- असे करण्यात आले – १९६७
ऍटोमिक एनर्जी रेग्युलेटिंग बोर्ड – १९८३
अणु ऊर्जा समिती मंडळ – ऑगस्ट १९८४
अणु ऊर्जा विकास महामंडळ – १७ डिसे. १९९७.`
देशातील अणुभट्ट्या (शोध रियॉक्टर)
क्र. नाव पासून कार्यरत मदत क्षमता स्थळ
१. अप्सरा ४ ऑगस्ट १९५६ ब्रिटन १ मे. वॅट ट्रॉम्बे
२. सीरस १० जुलै १९६० कॅनडा ४० वॅट ट्रॉम्बे
३. झर्लिना १४ जुलै १९६१ स्वदेशी १०० मेगा वॅट ट्रॉम्बे
४. पूर्णिमा २२ मे १९७२ ———– १ मेगा वॅट ट्रॉम्बे
५. ध्रुव ८ ऑगस्ट १९८५ स्वदेशी १०० मे. वॅट ट्रॉम्बे
६. कामिनी १९८८ स्वदेशी ४० मेगा वॅट कल्पकम
(कोड - अ स. झ. प. ध. का.)
५६ ६० ६१ ७५ ८५ ८८
अणुविद्युत प्रकल्प
केंद्र राज्य स्थापना सहकार्य क्षमता
तारापूर महाराष्ट्र १९६९ अमेरिका १४०० मे. वॅ.
रावतभाट्टा राजस्थान
१)१९७२
२)१९८०
कॅनडा ७४० मे. वॅ.
नरोरा उत्तरप्रदेश
१)१२ मार्च १९८९
२) २४ ऑक्टो १९९१
४४० मे. वॅ.
कल्पकम तामिळनाडू
१)जाने. १९८४
२)२१ मार्च १९८६
स्वदेशी
४४० मे. वॅ.
६६० मे. वॅ.
कैगा कर्नाटक-१९९३
काक्रापारा गुजरात – १९९५
(जगातील अत्युच्च दर्जाचे)
४४० मे. वॅ.
उमरेड महाराष्ट्र निर्माण कार्य स्वरूप
कुंडाकुलम तामिळनाडू रशिया
अणुभट्ट्यामध्ये झालेले अपघात – अमेरिकेतील लॉग आयलँड व रशियातील चर्नोअबल येथे घडला आहे.
भारतातील सर्वाधिक क्षमतेचा (५४०मेगावॅट) अणूऊर्जा प्रकल्प ६ मार्च २००५ रोजी तारापूर (मुबंई) येथे कार्यान्वीत झाला.
जैतापूर ( रत्नागिरी) – प्रस्तावित अणू विद्युत प्रकल्प.
देशातील पहिला फार्स्ट ब्रिडर न्युक्लिअर रिऍक्टर – कल्पकम तामिळनाडू.
दि. ११ ऑक्टोबर २००८ रोजी भारत व अमेरिका यांच्या दरम्यान आण्विक करार झाला. यामुळे जगातील ४५ अणु इंधन पुरवठा करणा-या देशांनी या करारास मान्यता दिली. त्यामुळे भारतास अणु इंधन मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला.
या करारास हेन्री हॉईड करार (कलम १२३) असेही म्हणतात.
यामुळे भारातातील २२ अणुभट्ट्यांतील १४ अणु भट्ट्या आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा आयोगाच्या निरक्षणाखाली येणार आहे.
अमेरिकेत पूर्वी ३० सप्टे. २००८ रोजी भारताने फ्रान्स सोबत अणुकरार केला. फ्रान्सनंतर असा करार करणारा अमेरिका हा दुसरा देश ठरला.
भारताच्या अणुबॉम्ब चाचण्या -
१) शास्त्रज्ञ राजा रामोण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १८ मे१९७४ रोजी ‘आणि बुध्द हसला” या सांकेतिक नावाने २ यशस्वी अणु चाचण्या घेण्यात आल्या.
२) दि. ११ व १३ मे १९९८ रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोखरण येथे पाच अणु बॉम्ब चाचण्या घेण्यात आल्या. यात एक हायड्रोजन बॉम्ब होता.
अणु विकास
जडपाणी प्रकल्प – जडपाण्याचा संचलन व शीतकरण घटक म्हणून अणुभट्टीत वापर केला जातो.
देशातील पहिले जडपाणी प्रकल्प पंजाबमध्ये – नानगल या ठिकाणी १९६१ मध्ये सुरू झाला.
अमोनिआ – हायड्रोजन प्रक्रियेद्वारा जडपाणी निर्मिती करणारे प्रकल्प – नानगल (पंजाब), बडोदरा (गुजरात), तालचेर (ओरिसा), तूतीकोरीन (तामीळनाडू), थळ (महाराष्ट्र), हाजिरा (गुजरात)
हायड्रोजन सल्फाईडद्वारा जडपाणी निर्मिती करणारे प्रकल्प – रावतभाटा (राजस्थान) व मणगुरू (आंध्रप्रदेश)
अणुऊर्जा खात्याच्या अखत्यारीत काम करणा-या संस्था
१. भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर (BARC) – मुंबई – १९५७
२. इंदिरा गांधी सेंटर फॉर ऍटोमिक रिसर्च ( IGCAR ) – कल्पकम ( तामिळनाडू)
३. सेंटर फॉर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी – (CAT) इंदोर (म. प्रदेश)– १९८४
४. व्हेरिएबल एनर्जी सायक्लोन सेंटर (VECC) – कोलकाता (प. बंगाल)
५. ऍटोमिक मिनरल्स डिव्हीजन ( AMD) – हैद्राबाद (आंध्रप्रदेश)
मंदायक (मॉडरेटर) म्हणून वापर करतात. – ग्राफाइट
शोषक (ऑब्जर्वर) म्हणून वापर करतात. – कॅडमियम, बोरॉनयुक्त पोलाद. बेरेलियम.
औद्योगिक संस्था
१. हेवी वॉटर बोर्ड (WHB) , मुंबई
२. न्युक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स (NFC) , हैद्राबाद (A.P.)
३. बोर्ड ऑफ रेडिएशन ऍन्ड आयसोटोप टेक्नॉलॉजी ( BRIT) , मुंबई
सार्वजनिक निगम-
१. न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCL) , मुंबई
२. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL), जादूगोडा (झारखंड)
३. इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IRE), केरळ
४. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL), हैद्राबाद (आंध्रप्रदेश)
अणु ऊर्जा खाते पुढील ७ स्वायत्त संस्थाना अर्थसाहाय्य करते.
१. टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई
२. टाटा मेमोरिअल सेंटर (TMC) , मुंबई
३. सहा इन्स्टिट्युट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स ( SINP) , कोलकाता
४. इन्स्टिट्युट ऑफ फिजिक्स ( IOP ) , भुवनेश्वर (ओरिसा)
५. मेहता रिसर्च इन्स्टिट्युट ( MRI) , अलाहाबाद, (U.P)
६. इन्स्टिट्युट ऑफ मॅथेमेटिकल सायन्सेस (IMSC), चेन्नई.
७. इन्स्टिट्युट फॉर प्लाझमा रिसर्च (IPR) , गांधीनगर (GJ)
अवकाश संशोधन
पृथ्वी ही मानवी मनाचा पाळणा आहे. पण पाळण्यात कोणी कायम राहू शकत नाही. – जिओलोव्हस्की (रशिया)
मानवाने सोडलेला पहिला उपग्रह ज्याद्वारे अवकाश युगाची सुरूवात झाली- स्फुटनिव -१
हा उपग्रह रशियाने ४ ऑक्टो, १९५७ ला सोडला, (स्फुटनिकचा अर्थ – सहप्रवासी किंवा उपग्रह)
अमेरिकेने सोडलेला पहिला उपग्रह – ( ३१ जाने. १९५८), एक्सप्लोरर -१
अंतराळात जाणारा पहिला मानव – युरी गागारीन (रशिया) (१२ एप्रिल १९६१- व्होस्टोक – १द्वारे)
अंतराळात जाणारा पहिला प्राणी – कुत्रा, लायका नावाची कुत्री, स्फुटनिक -२ द्वारे
अंतराळात चालणारा पहिला मानव – ऍलेक्सी लिआनोव्ह (व्होस्टोक -२)
अंतराळात जाणारी पहिली महिला – व्हॅलेंटिना तेरेस्कोव्हा (रशिया ),१६ जून १९६३ व्होस्टोक – ६द्वारा)
पहिली अमेरिकन पृथ्वी प्रदक्षिणा – ऍलन शेफर्ड (५ मे १९६१, फ्रिडम -७)
चंद्रावर गेलेले पहिले मानवरहित यान – (३ फेब्रु. १९६६००) ल्युना -१
रशियाचे १९६९ मध्ये पहिले अवकाश स्थानक – स्कायलॅब
रशियाची १९७० मध्ये पहिली मानवरहित अवकाश प्रयोगशाळा - सॅल्यूत
चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल टाकले गेले – २० जुलै १९६९
नील आर्मस्ट्राँग आणि एडविन आल्ड्रिन, अपोलो – ११द्वारे
मंगळ ग्रहाच्या संशोधनासाठी अमेरिका व रशियाने सुरू केलेली मालिका -१९७५ पासून अपोलो सोयूज, दुसरी मालिका – १९९५ पासून अटलांटिक मीर
अमेरिकेने मंगळावर पाठविलेले यान – पाथ फाइंडर ( ४ जलै, १९९७
अमेरिकेने पाठविलेले पहिले स्पेस शटल – कोलंबिया (१२ एप्रिल १९८१) – नष्ठ – १ फेब्रु २००३
त्यानंतर पाठविलेले स्पेस शटल – चॅलेंजर, डिस्कव्हरी आणि अटलांटिस
रशियाने स्थापन केलेल्या अवकाश केंद्र किंवा स्थानक – मीर ( २० फेब्रु, १९८६ वजन १३० टन)
लोकांना दूरदर्शनद्वारा पहिले रॉकेटचे प्रत्यक्ष प्रक्षेपण बघायला मिळाले. – ३ मार्च १९८६ मध्ये पाठवलेले रशियाचे सोयुज – १५ या उपग्रहाचे
१९९ देशांच्या सहकार्याने बनलेली युरोपियन अंतरिक्ष एजन्सिने (E.S.A.) सोडलेले रॉकेट- एरियन रॉकेट
जगात अंतराळ पर्यटन करणारे मानव
१. डेनिस टिटो, अमेरिका
२. मार्क शटल बर्थ- आफ्रिका
३. ग्रेगरी ओल सेन – अमेरिका
४. अनुशेह अन्सारी (इराण – अमेरिकी)
भारत आणि अवकाश संशोधन
१९६२ मध्ये इंडियन नॅशनल कमीटी फॉर स्पेस रिसर्च या समितीची स्थापना विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
अग्णिबाण प्रक्षेपण केंद्र – थूंबा १९६३ (केरळ)
थूंबा हे चुंबकीय विषुववृत्तावर आहे.
थूंबा येथून अमेरिकेने बनावटीचे नायके अपाचे हे पहिले रॉकेट भारताने सोडले – २१ नोव्हे. १९६३
अंतराळ संशोधन विषयक सर्व संस्थांना जोडणारी भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO)-१९६९ (बंगळूर)
केंद्र सरकारने अंतरिक्ष आयोग (स्पेस्स कमिशन) अवकाश विभागाची स्थापना केली- १९७२, मुख्यालय -बंगळूर
१९ एप्रिल १९७५ या दिवशी रशियाच्या सहकार्याने भारताचा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला – आर्यभट्ट (वजन ३६० कि. ग्रॅ.)
सॅटेलाइट ट्रेकिंग ऍन्ड स्टेशनची (उपग्रह स्थानक ) ची स्थापना – कावलूर ( तामिळनाडू) – १९७७
देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र १९७१ पासून कार्यरत आहे – आर्वी ( पुणे-महाराष्ट्र)
वैश्विक किरणांचे संशोधन करण्याच्या उद्देशाने अवकाश संशोधन केंद्र व भाभा अणुशक्ती केंद्र यांनी ४ वर्ष केलेल्या संशोधनानंतर ४५ किलो वजनाचा, ४८ से.मी. व्यासाचे,५३ से.मी. उंचीचे अनुराधा हे उपकरण अमेरिकेच्या चॅलेंजर अवकाश यानातून पाठविण्यात आले. या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक शास्त्रज्ञ डॉ. सुकुमार विश्वास हे होते.
अंतराळात जाणारा पहिला भारतीय म्हणून यांना मान दिला जातो. – स्कॉड्रन लिडर – राकेश शर्मा (सोयुझ टी- ११)
मानवास अंतराळात पाठविणारा भारत हा १४ वा देश, तर राकेश शर्मा १३८ वा अंतरिक्ष ठरला.
अंतराळात जाणा-या पहिल्या भारतीय महिला – कल्पना चावला (जन्म कर्नुल-हरियाणा) २० नोव्हे. १९९७ रोजी अवकाशात जाणा-या कोलंबिया या अवकाशात या यानाद्वारे प्रवास केला.
कोलंबिया दुर्घटनेनंतर अमेरिकेने डिस्कव्हरी हे स्पेस शटल अंतराळात पाठविले.
कल्पना चावला नंतर नासामध्ये संशोधन करणारी दुसरी भारतीय महिला – सुनिता विल्यम्स.
दोन वेळा अवकाशात भ्रमण करणा-या पहिल्या भारतीय महिला – कल्पना चावला
कोलंबिया यान पृथ्वीवर उतरतांना अपघातग्रस्त होवून सात अंतराळविरासह मृत्युमुखी – १ फेब्रु, २००३
केवळ हवामानविषयक अभ्यास संशोधन व निष्कर्ष यांच्याशी निगडीत असा भारताचा पहिल्या उपग्रहाचे नाव – मॅट सॅट (मॅट सॅट चे नामकरण – कल्पना – १ ) १२ सप्टेंबर,२००२
१५ ऑगस्ट २००३ ला भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून चंद्रायान (सोमयान) ची घोषणा केली.
११ सप्टेंबर २००३ ला मिशन चंद्रयानाला मंजूरी दिली. चांद्रयान – १ ही भारताची पहिली चांद्रमोहीम आहे. दि. २२ ऑक्टो. २००८ रोजी आंध्र प्रदेशामधील श्रीहरीकोटा येथिल सतीश धवन आंतरिक्ष केंद्रावरून सायंकाळी ६.२० वा. धृवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन ( PSLV-C-11 ) द्वारे चांद्रायानचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
चांद्रयाण चंद्राच्या कक्षेत पोहोचले. – ८ नोव्हेंबर -२००८
भारताची मोहीम ही जगातील ६८ व्या चांद्र मोहीम होती. तर चंद्रयान पाठवणारा भारत हा देश ठरला – ६वा
अंतरिक्ष आयोगाचे प्रमुख केंद्रे-
१. विक्रम साराभाई स्पेस सेंटर – तिरूअनंतपूरम, केरळ (१९६२)
२. इंडिअन सायंटिफिक सॅटेलाईट प्रोजेक्ट (ISRO) – बंगळूर (१९७१)
३. स्पेश ऍप्लिकेशन सेंटर (SAC) – अहमदाबाद – (१९६८)
४. श्री हरिकोटा रेंज, श्रीहरीकोटा (SHAR) (आंध्रप्रदेश) (नामकरण – सतिश धवन)
५. मास्टर कंट्रोल फॅसिलिट (मुख्य नियंत्रण सुविधा) – हसन (कर्नाटक)
६. इस्त्रो टेलिमेट्री ट्रेकिंग अँड कमांड कम्युनिकेशन नेटवर्क – बंगळूर
७. लिक्वीड प्रोप्युलुझन सिस्टिम युनिट – तिरूअनंतपूरम
८. डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन कम्युनिकेशन युनिट – अहमदाबाद
९. नॅशनल रिमोट सेसिंग एजन्सी – हैद्राबाद
१०. भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान क्षमतेचे व्यापारीकरण करण्यासाठी अंतरिक्ष कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. ची स्थापना करण्यात आली. – बंगळूर – १९९२
थुंबा रॉकेट केंद्र, थुंबा- तिरूअनंतपूरम
फिजीकल रिसर्च लॅब्रोटरी- अहमदाबाद (गुजरात) फिजिकल लॅब्रोटरी- दिल्ली
सॅटेलाईट लाँच व्हेईकल प्रोजेक्ट- तिरूअनंतपूरम –(केरळ)
आकाश विज्ञान विद्यापीठ – मुंबई.
भारतीय अंतराळ कार्यक्रम
भारतीय अंतराळ कार्यक्रम हा बव्हंशी नागरी आणि शांततापूर्ण कारणांसाठी आहे. यामध्ये ३ बाबींचा समावेश होतो.
१. उपग्रहांची बांधणी (दूरसंवेदन व दूरसंचार उपग्रह)
२. वाहकांची (लाँच व्हेईकल्स) निर्मिती आणि विकास
३. उपग्रहांना कक्षेत स्थिर करणे
भारतीय सुदूरसंवेदन उपग्रह (इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट)- यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० कि. मी. (लोअर्थ आर्बीट) अंतरावरून निरिक्षण करण्याची व्यवस्था असते. यात पृष्ठभागांवरील वस्तूंची विकीरणाद्वारे(Radiation) माहिती मिळवितात. पृथ्वीच्या पृष्ठभागाला प्रत्यक्ष स्पर्श न करताही माहिती मिळविता येते असल्याने त्यास सुदूर संवेदन असे म्हटले जाते. सुदूर संवेदनाद्वारे विस्तृत भुभागाची सुव्यवस्थित व अचूक माहिती अल्पावधीत मिळविता येते.
भारताने IRS उपग्रहाद्वारे १९८८ पासून माहिती मिळण्यास सुरूवात केली. हे उपग्रह ध्रुवीय कक्षेत सोडतात. ते दक्षिण-उत्तर असे भ्रमण करतात व पृथ्वीभोवती ४ ते ५ दिवसांत एक फेरी पूर्ण करतात.
मे १९९७ IRS-P 4 मध्ये किंवा ओशियन सॅट PSLV – C 2 या वाहकाद्वारे श्रीहरीकोटा येथून सोडला. ओशियन सॅटच्या प्रक्षेपणाने भारताने आपले लक्ष भूपृष्ठावरून समुद्रविषयक भागावर केंद्रीत केले.
PSLV – C2 हे पहिले वाहक होते. ज्याद्वारे इतर देशांचे उपग्रह सोडण्यात आले उदा. –जर्मनी, द. कोरिया
दूरसंवेदनाचे महत्व व उपयोग-
१. उपग्रहाद्वारे एकाचवेळी अनेक गोष्टींचे निरीक्षण करता येते उदा. – खनिजे व नैसर्गिक तेल व वायु इ.
२. पिकाखालील क्षेत्र, पुराची पूर्वसुचना, नैसर्गिक खनिजे, हिमालयातील नद्या, हिमरेषांची हालचाल इ.
३. कृषी क्षेत्र – भूमी उपयोग, भाकित रोगांचे प्रमाण, टोळ धाडींची हालचाल, सिंचनासाठी धरणातील पाण्याची उपलब्धता इ. बाबींची माहिती मिळते.
४. प्लॅक्टनच्या उपलब्धतेनुसार समुद्रात मासेमारीची अधिक क्षमता कोठे आहे हे निश्चित करण्यासाठी.
५. वनक्षेत्र-वनक्षेत्र निश्चित करणे, झाडांच्या प्रजातिचे वितरण, प्राण्यांचे स्थलांतर, वणव्यांवर लक्ष ठेवणे इ.
६. २४ तास अगोदर हवामानाचा अंदाज वर्तविता येतो.
७. दूरसंवेदनाचे व्यापारी उपयोग- IRS द्वारे पुरविलेल्या डाटाच्या मार्केटिंगसाठी अंतरिक्ष कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले. अंतारिक्ष कॉर्पोरेशच्या करारामुळे भारतास १ बिलियन डॉलर इतकी प्राप्ती होईल.
८. कर्नाटक पोलिसांच्या टास्क फोर्सने चंदनचोर विरप्पनचा मागोवा घेण्यास दूरसंवेदनाचा डाटा वापरला होता. त्याप्रमाणे लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा थरच्या वाळवंटात शोध लावण्याकरिता दूरसंवेदन उपग्रहांच्या प्रतिमा वापरल्या.
भारतीय दूरसंचार उपग्रह व्यवस्था / Indidan National Satellite System ( INSAT)
दूरसंचार उपग्रह भूस्थिर – (Geo-Stationary) हा उपग्रह असून पृथ्वीपासून ३६ हजार कि. मी. इतक्या उंचीवर स्थिर केलेले असतात. पृथ्वीवरील निश्चित बिंदूवर (देशावर) हे उपग्रह स्थिर असून पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाइतकाच त्याचा वेग असतो. म्हणजेच भूस्थिर उपग्रह २४ तासात पृथ्वीभोवती १ फेरी पूर्ण करतात. हे उपग्रह पश्चिम ते पूर्व असे भ्रमण करतात.
या उपग्रहाची निर्मीती – प्रसार भारती कॉर्पोरेशन, भारतीय हवामान खाते, दूरसंचार विभाग यांच्या संयुक्तपणे इन्सॅट प्रणालीची निर्मिती केली जात असली तरी अवकाश विज्ञान मंत्रालयाकडे इन्सॅटची कार्यात्मक जबाबदारी सोपविली आहे.
इन्सॅट उपग्रह प्रणालीची सुरूवात १९८२ मध्ये झाली. सध्या इन्सॅटची चौथी पिढी अवकाशात स्थिर करण्याचे कार्य चालू आहे.
१. इन्सॅटची पहिली पिढी – इन्सॅट- १ – अ, १- ब, १- क, १- ड,
२. इन्सॅटची दुसरी पिढी – इन्सॅट -२-अ,२-ब, २-क, २-ड, २-इ,
३. इन्सॅटची तिसरी पिढी- इन्सॅट – ३-ब, ३-क, ३-अ, ३-इ,
४. इन्सॅटची चौथी पिढी – १) इन्सॅट – ४- अ दि. २५ डिसेंबर २००५ रोजी प्रक्षेपण
२)इन्सॅट – ४-ब, दि. १० मार्च २०१० रोजी प्रक्षेपण
३) इन्सॅट- ४ – क,दि. १० जुलै २००६ रोजी GSLV-F-02 , द्वारे श्रीहरी कोटा येथून GSLV- F- 04 द्वारे येथून यशस्वी प्रक्षेपण केले. याचा उपयोग डी. टी. एच सेवांचा विकास करण्यासाठी होणार आहे.
उपग्रह प्रणालीचे व्यावहारिक उपयोग-
१. दूरदर्शन देशातील ९०% लोकांपर्यंत पोहचू शकते. याचे श्रेय इन्सॅट उपग्रहाकडे जाते. इन्सॅट २ मुळे दूरदर्शन सेवा अग्नेय व मध्य आशियापर्यंत पोहचू शकते.
२. इन्सॅटमुळे देशातील लहानमोठी ठिकाणे दूरसंपर्क योजनेमुळे जोडली गेली आहेत.
३. हवामानाचा अंदाज वर्तविणे, आकाशवाणीचे प्रसारण, माहितीचे वहन, टेलिप्रिंटर, संगणक जाल, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देण्यास इंटरनेट जाल यांसाठी उपयोगी आहे.
४. शोध आणि मदत कार्यांसाठी – जहाजांद्वारे संकटकालीन संदेश पाठवून मदत कार्य मिळविता येते.
भारतीय प्रेक्षपक वाहकांचा विकास ( लॉंच व्हेईकल)
उपग्रहांचे प्रक्षेपण व संरक्षण क्षेत्रासाठी प्रक्षेपक वाहकांचे अत्यंत महत्व आहे.
भारताने १९८० पासून प्रक्षेपक वाहनांच्या निर्मितीला सुरूवात केली.
SLV- सॅटेलाईट लाँच व्हेइकल – ३०० कि. मी.
ASLV- ऍग्युमेटेड सॅटेलाईट लाँच व्हेइकल – ७०० कि. मी.
PSLV- पोलार सॅटेलाईट लाँच व्हेइकल – १००० कि. मी.
GSLV – जियोसॅक्रोनाईस सॅटेलाईट लाँच व्हेइकल- ३६००० कि. मी
या चारही पिढ्यांतील प्रक्षेपक वाहनांची भारताने यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. प्रक्षेपक वाहनातील इंधन तंत्रज्ञानावरही भारताने प्रभुत्व मिळवले आहे.
प्रक्षेपक वाहनांचे उपयोग व महत्व
१. भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण कमी खर्चात होऊ शकते.
२. इतर देशांचे उपग्रह अवकाशात सोडून परकीय चलनाची प्राप्ती होते.
३. भारताला हेरगिरीसाठी स्वतःचे उपग्रह सोडता येतील.
४. PSLV च्या यशस्वी प्रेक्षपणानंतर भारताची आंतरखंडिय क्षेपणास्त्राची क्षमता दिसून येते.
अग्निबाणाच्या ज्वलन कोटीचे तापमान २०००० C असते, त्यामुळे ज्वलन कोटीसाठी ग्रॅफाइट वापरतात.
भारतातील सर्वात मोठे कॉम्प्युटर नेटवर्क, अग्नीबाण व उपग्रह जुळणी केंद्र, ते उड्डाणास योग्य आहे की नाही याचा निर्णय, आवश्यक इंधन निर्मिती प्रकल्प श्रीहरीकोटा येथे आहे.
रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी सेंटर – उटकमंड
भूस्थिर उपग्रह पृथ्वीभोवती एक फेरी २४ तासात पूर्ण करतात तर इतर उपग्रह १ फेरी पूर्ण करतात – ९० मिनिटांत
भारतीय बनावटीचे पहिले अंतरिक्ष प्रक्षेपन वाहन- SLV-3
इन्सॅट प्रक्षेपणानंतर नियंत्रणाची जबाबदारी- हसन (कर्नाटक)
धोक्याची सुचना देणारी यंत्रणा असणारा जगातील अवकाशात फिरणारा एकमेव उपग्रह – इन्सॅट 2A
अग्निबाणाच्या कार्यपध्दतीचे मुलत्वांचे वर्णन करणारा शास्त्रज्ञ – जिओलोव्हस्की (USSR)
अग्नी बाण शास्त्राचा जनक, पहिला द्रवरुप इंधनावर चालणारा अग्निबाण तयार करणारा शास्त्रज्ञ ; गोगार्ड
USA ची मंगळावरील मालिका – व्हायकींग
राज्यात रिमोट सेन्सीग ऍप्लीकेशन – नागपूर (१९८८)
कौरु (कोअरु) प्रक्षेपण स्थळ फ्रेंच गियाना (द. अमेरिका ) मध्ये आहे.
चीनने १५ आक्टो. २००३ मध्ये पाठवलेले यान -शेनझाऊ -V
याअंतराळ्याद्वारे अंतराळ्यात पाठविलेला पहिला अंतरिक्ष यात्री- यांग लीवी.
भारताचा उपग्रह कार्यक्रम – एक दृष्टीक्षेप
क्र. उपग्रह प्रक्षेपण वाहन प्रक्षेपण दिनांक कार्य
१. आर्यभट्ट
२. भास्कर-१
३. रोहिणी
४. रोहिणी RS 1
५. रोहिणी RSD 1
६. ऍपल
७. भास्कर -२
८. इन्सॅट १ ए
९. रोहिणी RSD२
१०.इन्सॅट १ बी
११.श्रोस-१
१२.इन्सॅट १ बी
१३.श्रोस -२
१४.इन्सॅट १सी
१५.इन्सॅट १ डी
१६.IRS -१ए
१७.श्रोस ३
१८.इन्सॅट २ ए
१९.इन्सॅट २ बी
२०.IRS -१
२१.श्रोस सी.
२२.I.R.S.P-2
२३.इन्सॅट २सी
२४.I.R.S-1c
२५.I.R.S-P3
२६.एन्सॅट २ डी
२७.I.R.S. D -१
२८.इन्सॅट २ ई.
२९.I.R.S. P-4
३०.इन्सॅट ३ बी
३१.सी-सॅट
३२.टी. ई.एस. ३२
३३.इन्सॅट ३ सी
३४.मॅट –सॅट(कल्पना)
३५.इन्सॅट ३ ए.
३६.जी –सॅट २
३७.इन्सॅट ३ ई
३८.रिसॉट सॅट
३९.एज्युसॅट
४०.हॅमसॅट व कार्टोसॅट
४१.इन्सॅट ४ सी
४२.कार्टोसॅट – २
४३.इटलीचा एजाईल
४४.इन्सॅट-४
४५.पोलरीज(इस्त्राईल)
४६.कार्टोसॅट -२ए
४७.चंद्रयाण -१
इंटर कॉसमॉस U.S.S.R.
इंटर कॉसमॉस U.S.S.R.
एस. एल.वी-३ (भारत)
एस. एल.वी-३ (भारत)
एस. एल.वी-३ (भारत)
एरियन ( युरोपिय अंतरिक्ष एजंसी)
इंटर कॉसमॉस U.S.S.R.
डेल्टा
एस. एल.वी-३ (भारत)
चॅलेजर शटल
एस. एल.वी- (भारत)
वास्तोक
एस. एल.वी- (भारत)
एरियन
डेल्टा
सेव्हियत रॉकेट
एस. एल.वी-४ (भारत)
डेल्टा ( सं. रा. अमेरिका)
एरियन (युरोपिय अंतरिक्ष एजंसी)
पी. एस. एल. व्ही.(भारत)
एस. एल.वी- ४(भारत)
एरियन (युरोपिय अंतरिक्ष एजंसी)
मोलनिया
पी. एस. एल. व्ही.डी.३
एरियन (युरोपिय अंतरिक्ष एजंसी
पी. एस. एल. व्ही.डी१
एरियन
पी. एस. एल. व्ही.सी २
एरियन ५
पी. एस. एल. व्ही.डी. १
पी. एस. एल. व्ही.सी. ३
एरियन -४
पी. एस. एल. व्ही.सी.(भारत)
एरियन ५ (युरोपिय अंतरिक्ष एजंसी)
जी. एस. एल.व्ही.
एरियन ५ (युरोपिय अंतरिक्ष एजंसी)
पी. एस. एल. व्ही.सी.-५
(राज्यसेवा २००६)
पी. एस. एल. व्ही.सी.६
जी. एस. एल.व्ही.-०२
पी. एल. व्ही.सी-७
पी.एस. एल. व्ही.एफ -४
सी.आर. जीएल. व्ही.एफ – ४
पी.एस. एल. व्ही.एफ –४
पी.एस. एल.व्ही.एफ-१०
पी.एस. एल.व्ही.एफ-११
१९/४/७५
७/६/७९
१०/८/७९
१८/७/८०
३१/५/८१
१९/६/८१
२०/११/८१
१०/४/८२
१७/४/८३
३०/८/८३
२४/३/८७
१९/३/८८
१३/७/८८
२२/७/८८
१२/६/९०
२९/८/९१
१९/५/९२
१०/७/९२
२३/७/९३
२०/८/९३
४/५/९४
१५/१०/९४
७/१२/९५
२८/१२/९५
२१/३/९७
४/६/९७
२९/९/९७
३/४/९९
२६/५/९९
२७/३/२०००
१८/४/२००१
२२/१०/२००१
२४/१/२००२
१२/९/२००२
१०/४/२००३
८/५/२००३
२८/९/२००३
१७/१०/२००३
२९/९/२००४
५/५/२००५
१०/७/२००६
१०/१/२००७
२३/४/२००७
२/९/२००७
२१/१/२००७
२८/४/२००८
२२/१०/२००८
वैज्ञानिक
पृथ्वी सर्वेक्षण
पृथ्वी सर्वेक्षण (अयशस्वी)
पृथ्वी सर्वेक्षण
वैज्ञानिक (अयशस्वी)
संचार
पृथ्वी सर्वेक्षण
बहूउद्देशिय
वैज्ञानिक
बहूउद्देशिय
तंत्रज्ञानिक
दूरसंवेदी
तंत्रज्ञान (अयशस्वी)
बहूउद्देशिय (अयशस्वी)
बहूउद्देशिय
दूरसंवेदी
तंत्रज्ञान
बहूउद्देशिय
बहूउद्देशिय
दूरसंवेदी(अयशस्वी)
तंत्रज्ञान
दूरसंवेदी
बहूउद्देशिय
दूरसंवेदी
दूरसंवेदी
बहूउद्देशिय
दूरसंवेदी
व्यावसायिक
समुद्र पर्यवेक्षण
बहूउद्देशिय
पृथ्वी सर्वेक्षण
औद्योग्यिक पर्यवेक्षण
बहूउद्देशिय
हवामान सर्वेक्षण
बहूउद्देशिय
बहूउद्देशिय
बहूउद्देशिय
दूरसंवेदी
शिक्षण
बहूउद्देशिय
अयशस्वी
यशस्वी
सफल
डी.टी.एच.
लष्करी वापर
यशस्वी
टिप ; पी.एस.एल.व्ही.-सी ने एकाच वेळी १० उपग्रह आकाशात सोडण्याचा भारताने पराक्रम केला. त्यात त्याने दोन भारतीय व आठ देशांचे आठ इतर उपग्रह होते.
No comments:
Post a Comment